Impact of Lockdown on the Environment | लॉकडाऊन काळात उद्योग, दळणवळण बंद होते. परंतु, या काळात निसर्गाने मात्र मोकळा श्वास अनुभवला.
निसर्गाची प्रेरक शक्ती यामध्ये पर्यावरण हे सर्व सजीव आणि निर्जीव घटक आणि त्यांचे मानवी जीवनावर प्रभाव टाकणारे परिणाम यांची बेरीज म्हणून परिभाषित केले जाऊ शकते. (Impact of Lockdown on the Environment )
सर्व सजीव किंवा जैविक घटक प्राणी, वनस्पती, जंगले, मत्स्यपालन आणि पक्षी असले तरी, निर्जीव किंवा अजैविक घटकांमध्ये पाणी, जमीन, सूर्यप्रकाश, खडक आणि हवा यांचा समावेश होतो. त्यामुळे पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज आहे, त्याकडे सर्वांनी गंभीरपणे लक्ष दिले पाहिजे.
Table of Contents
पर्यावरणावर परिणाम करणारे घटक
निसर्गावर मानव हा कायमच; अत्याचार करत आलेला आहे. वाहतूक, उद्योग, वीज केंद्र, पर्यटन यांचा पर्यावरणावर; परिणाम होत असतो. त्याबरोबर औद्योगिकीकरण, शहरीकरण, वाढती लोकसंख्या; आणि प्लास्टिक प्रदूषण वाढत आहे. जंगलतोड, नद्यांमध्ये सोडले जाणारे सांडपाणी; औद्योगिक सांडपाणी आणि वायू प्रदूषण वाढत असून; पर्यावरणाचे फार मोठया प्रमाणात; नुकसान होत आहे.
मानव निर्मित धातू व प्लास्टिक वस्तूंबद्दलचे आपले प्रेम पर्यावरणावर काय पणिाम करते; याचा विचार आपण करत नाही. भारत सरकारने काही प्लॅस्टिक वापरावर बंदी आनली; त्यामुळे काही प्रमाणात प्लॅस्टिकचा वापर कमी झाला असला तरी; पूर्णपणे बंद झालेला नाही. त्यासाठी आपण सर्वांनी साथ देण्याची गरज आहे. (Impact of Lockdown on the Environment)

‘पर्यावरणावर होणारा मानवी परिणाम’; हा जगभरातील तज्ञांसाठी चर्चेचा मुख्य विषय बनला आहे. वैद्यकीय क्षेत्रात प्रचंड सुधारणा; औषधांमध्ये सुधारणा यामुळे मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. शेती विकसीत होत असून; उत्पन्नात वाढ होत आहे. या सर्व सकारात्मक गोष्टी घडत असतांना पर्यावरणावर मात्र त्यांचा विपरीत परिणाम होतांना दिसतो.
उर्जेसाठी कोळसा आणि जीवाश्म इंधनांवरील आपले अवलंबित्व; ही आणखी एक समस्या आहे. लोकसंख्या जितकी जास्त असेल; तितकी जास्त जीवाश्म इंधन वापरली जातील. पर्यावरणावरील मानवी परिणाम जाणून घ्या. जीवाश्म इंधन (जसे तेल आणि कोळसा) च्या वापरामुळे; मोठ्या प्रमाणात कार्बन डाय ऑक्साईड हवेत मिसळतो; त्यामुळे हजारो प्रजाती नष्ट होण्याची भीती निर्माण होते. (Impact of Lockdown on the Environment)

मानवांना जागेची आवश्यकता असते; आणि त्यापैकी बरीच जागा वसाहत, शेती आणि उद्योगांसाठी वापरली जाते. वाढत्या लोकसंख्येचा परिणाम अधिक स्पष्टपणे होतो; परिणामी मोठ्या प्रमाणात इकोसिस्टम खराब होते. हवा फिल्टर करण्यासाठी; पुरेसी झाडी नसल्यास, co2 पातळी वाढते ज्यामुळे पृथ्वीवरील प्रत्येक जीवाचे नुकसान होण्याची शक्यता असते. (Impact of Lockdown on the Environment)
निसर्ग आणि मानव
आज संपूर्ण जग ‘ कोरोना’ शी लढत आहे. ही नैसर्गिक आपत्ती आहे की मानव निर्मित याचा विचार करत बसण्याची ही वेळ नाही. तर आलेल्या संकटाला तोंड देत पुन: नव्याचे उभे राहण्याची वेळ आहे. निसर्गाच्या विरुद्ध गेल्यानंतर अनेक भयंकर परिणाम भोगावे लागतात हे जगाने आज अनुभवले आहे. तेंव्हा वेळोवेळी निसर्गाच्या विरुद्ध जाऊन लढत बसायचे की निसर्गाशी जुळवून भौगोलिक, आर्थिक व सामाजिक विकास साधायचा. याचा विचार करण्याची वेळ आता आलेली आहे. (Impact of Lockdown on the Environment)

निसर्गाला आपली गरज नाही; तर आपल्याला निसर्गाची गरज आहे. आपण आनंदी असलो; तर निसर्ग आनंदी होत नाही. तर नैसर्गिक वातावरण पाहून आपण आनंदी होतो; तेंव्हा आपल्या आनंदासाठी नैसर्गिक वातावरण बिघडणार नाही; याची काळजी आपणच घेतली पाहिजे. नैसर्गिक वातावरणसाठी आपण काही करण्याची मुळीच गरज नाही; ही प्रक्रिया निसर्ग स्वत: करतो. आपण थोडी झाडे लावली की; त्याचे फोटो काढत सर्वत्र आपल्या कार्याचा टेंभा मिरवतो. परंतू झाडे तोडतांना आपल्या कार्याचा; कतृत्वाचा विचार करत नाही.
तेंव्हा विकासाचे नाव पुढे करत त्या आड दडण्याचा प्रयत्न करतो; विकास-विकास करत मोठया प्रमाणात वृक्षतोड करायची; त्यासाठी प्रचंड पैसा खर्च करायचा; आणि पुन्हा झाडे लावण्यासाठी लाखो रुपये खर्च करायचे. हा खटाटोप करुन निसर्गावर उपकार करण्यापेक्षा; तो जसा आहे तसा राहू देण्याची कृपा करावी ही अपेक्षा मात्र निसर्ग निश्चितच करत असेल.
निसर्गामघ्ये मानवाने जर लुडबुड केली नाही तर; झाडे लावण्याचा खटाटोप करण्याची गरज पडणार नाही. निसर्गाच्या विरुद्ध जाऊन विकास करण्यापेक्षा; निसर्गाशी जुळवून घेऊन विकास करण्याची वेळ आलेली आहे. निसर्गावर अतिक्रमण करुन विकास करण्यापेक्षा; मानवाने केलेले अतिक्रमण हटवून विकास करणे केंव्हाही चांगले. पण तसे होत नाही; कारण निसर्ग गप्प राहतो, आपले तसे नाही. परंतू गप्प राहून आपला झटका मात्र निसर्ग दाखविल्याशिवाय राहात नाही; यासाठी त्सुनामीचे उदाहरण पुरेसे आहे. (Impact of Lockdown on the Environment )
लॉकडाऊन काळातील पर्यावरण

जगभर ‘COVID-19’ चा प्रसार वेगाने वाढत असताना, संपूर्ण जगाने मानवी गतिशीलतेला निर्बंध घालण्यासाठी कर्फ्यू, लॉकडाऊन, विलगीकरण या मार्गांचा स्विकार केला. त्यामुळे सर्व प्रकारच्या सामाजिक, आर्थिक, औद्योगिक आणि शहरीकरण क्रिया अचानक बंद झाल्या. (Impact of Lockdown on the Environment)
लॉकडाऊनमुळे संपूर्ण जग काही काळ थांबलेले होते; कारखाने, वायुगळती, विषारी पदार्थ इतरत्र फेकणे बंद हाेते. दुषित पाणी नदयापर्यंत पाेहचत नव्हते. रस्त्यावरील वाहने, धुळीचे प्रदुषण, खाणकाम, जंगलतोड; प्राणी संग्रहालये, उदयाने, व्याघ्रप्रकल्प हे सर्व बंद होते. या सर्वामुळे आर्थिक विकास थांबला; परंतू निसर्गाने मात्र मोकळा श्वास अनुभवला. लॉकडाऊनचा खरा फायदा; निसर्गाला झाला. स्वच्छ हवा, स्वच्छ नद्या, कमी आवाज प्रदूषण; व्यवस्थित आणि शांत वन्यजीव यांच्या गुणवत्तेत सुधारणा झाली.

दररोज गाडयांच्या हॉर्नच्या कर्कष आवाजाने; जागे होण्याची सवय लागलेल्या आम्हा लोकांना; कित्येक दिवसानंतर पक्षांचा चिवचिवाट ऐकायला मिळाला; प्राणी, पक्षी मुक्तपणे संचार करतांना आढळले. रस्त्याच्या कडेला असणारी झाडी आपले काळे तोंड न दाखवता; आनंदाने आपल्या मुळ रुपात डोलतांना दिसली. खरा निसर्ग अनुभवायला मिळाला. (Impact of Lockdown on the Environment )

‘कोरोना’ ने मानवाचा श्वास रोखला, पण निसर्गाने मात्र मोकळा श्वास अनुभवला. प्राणी व पक्षी मुक्तपणे संचार करताना आढळले. कदाचित त्यांनी केंव्हातरी विचार केलेला असेल ‘अपना टाईम आयेगा’ आता आपण विचार करण्याची गरज आहे की निसर्गावर असा विचार करण्याची वेळ येणार नाही याचा. निसर्गाने आपल्याला हा अनुभव दिला आहे. ही संधी दिली आहे की, आता तरी सुधरा, आर्थिक विकासाच्या नावाखाली होणारी आमची होरपळ थांबवा. (Impact of Lockdown on the Environment )

आतापर्यंत प्राणी मानवाच्या संपर्कात यायला घाबरत होते; परंतू आता, मानुस मानसाच्या संपर्कात यायला घाबरतो. निसर्गाच्या विरुध्द गेल्यास अशी संकट येत राहतील; तेंव्हा निसर्गाशी जुळवून घेणे आणि विकास करणे; हे आपल्या हिताचे आहे की नाही हे आपण ठरवायचे. (Impact of Lockdown on the Environment)
पर्यावरणाविषयीचे विचार
- जेंव्हा लोक वापरलेल्या गोष्टी फेकून देताना दिसतात; तेंव्हा आपण त्यांचं लक्ष वेधेल अशा कृतीतून त्यांना समज दिली पाहिजे.
- स्वच्छता आणि पर्यावरण ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. त्यासाठी मानसिकतेत बदल केल्याशिवाय प्रगती अशक्य आहे; आणि जे आपले विचार बदलू शकत नाहीत; ते काहीही बदलू शकत नाहीत.
- आपल्या अंगणातील झाडांसोबत घालवलेला वेळ कधीही वाया जात नाही; त्याचे फळ एकदिवस नक्कीच मिळते.
- जी व्यक्ती झाडे लावते, ती स्वतःशिवाय इतरांवर निश्चित प्रेम करते.
- विचारशील आणि वचनबद्ध नागरिकांचा एक छोटासा गट जग बदलू शकतो; याबद्दल कधीही शंका घेऊ नका; खरंच, ही एकमेव गोष्ट आहे; जी आतापर्यंत घडत आलेली आहे. (Impact of Lockdown on the Environment)
- जीवनात सतत आनंदी राहण्यासाठी माणूस आणि निसर्ग यांच्यात कधीही दुरावा असू नये.
- वातावरण म्हणजे जिथे आपण सगळे भेटतो; जिथे आपणा सर्वांचे परस्पर हित पाहतो; ही एक अशी गोष्ट आहे जी आपण सर्वजण सामायिक करतो.
- ज्या मनुष्याच्या मनात भविष्यातील पिढ्यांसाठी; आज काहीतरी बलिदान देण्याची असते; त्याचे बलिदान भविष्यातील पिढ्या कधिही विसरत नाहीत.
- जी व्यक्ती पर्यावरणाचा नाश करते, ती स्वतःचा नाश करते; कारण जंगले हे आपली आणि आपल्या मातीचे फुफ्फुसे आहेत; ते हवा शुद्ध करतात आणि आपल्याला; नवीन शक्ती आणि उर्जा देतात. (Impact of Lockdown on the Environment )
- Most Beautiful Flowers in the World | जगातील सर्वात सुंदर फुले
- Smartest Talking Birds In The World | जगातील 10 बोलणारे पक्षी
- Majhi Vasundhara Abhiyan | माझी वसुंधरा अभियान महाराष्ट्र शासन
आमच्या Etopcollectionवेबसाईटला जरुर भेट द्या, तसेच शैक्षणिक माहितीसाठी “ज्ञानज्योत”शैक्षणिक मराठी संकेत स्थळाला भेट द्या.