Categories
Culture

Importance of the Festival of Nag Panchami | नागपंचमी सणाचे महत्व

Importance of the Festival of Nag Panchami | नागपंचमी सणाचे महत्व, उपवास, झोका, कपडे, अलंकार, व नागपंचमी बद्दलच्या कथा घ्या जाणून…

भारतीय संस्कृतीमध्ये सणांच्या निमित्ताने; विविध वनस्पती आणि प्राणी यांना विशेष स्थान; आणि महत्व दिलेले आहे. हिंदू धर्मातील अनेक सण आणि उत्सव; वनस्पती आणि प्राणी या नैसर्गिक घटकांशी; संबंधीत आहेत. श्रावण महिन्यात येणा-या सनांपैकी नंगपंचमी हा एक सण आहे. (Importance of the Festival of Nag Panchami)

श्रावण महिण्यातील शुक्ल पंचमीच्या दिवशी; नागपंचमी हा सण साजरा केला जातो. या सणाच्या निमित्ताने प्रत्येकजण आपल्या घरी; नागदेवतेला प्रसन्न करण्यासाठी नागाची पूजा करतात. नाग भगवान शिवशंकर यांना प्रिय असल्यामुळे; नाग आणि भगवान शिवशंकर यांची पूजा करण्याची प्रथा आहे. (Importance of the Festival of Nag Panchami)

नागपंचमीचे महत्व

नागपंचमी सणाच्या दिवशी; नागदेवतेचे दर्शन व्हावे म्हणून; घराच्या दरवाजावर नागदेवतेचे चित्र काढून; किंवा नागदेवतेच्या फोटोची पूजा केली जाते. वारुळ हे नागदेवतेचे घर आहे असे मानतात; त्यामुळे स्त्रिया वारुळाची पूजा करतात. पूजेसाठी फुले, दुर्वा, पाणी, दूध व लाह्या; नागदेवतेला अर्पण करतात. नागदेवतेची पूजा करुन; आपले व आपल्या कुटुंबाचे संरक्षण करण्यासाठी प्रार्थना करतात. या दिवशी अष्टनागमंत्राचा जपही केला जातो.

असे म्हटले जाते की, या दिवशी नागासोबत भगवान शिव आणि रुद्राभिषेक केल्याने; कालसर्पदोष दूर होतो; तसेच घरात सुख, शांती आणि समृद्धी येते. कारण नाग भगवान शिवशंकराच्या गळयात विराजमान आहे; आणि नाग पृथ्वीला संतुलित करतात; त्यामुळे नागपूजनाला पुराणामध्ये महत्व आहे.  (Importance of the Festival of Nag Panchami)

धार्मिक मान्यतेनुसार असे मानले जाते की; नागदेवता लक्ष्मीचे रक्षण करते. त्यामुळे धनसंपदा आणि समृद्धी मिळवण्यासाठी नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते. असेही मानले जाते की, भगवान श्रीकृष्णाने यमुना नदीमध्ये; कालिया नागाचे मर्दन केले तो दिवस म्हणजे; श्रावण शुक्ल पंचमी होता. तेंव्हापासून नागपूजेची प्रथा सुरु झाली.  

नागपंचमी उपवासाचे महत्व

पुराणातील कथेनुसार, सत्येश्वरी नावाची दुय्यम दर्जाची एक देवता होती; त्या देवतेला सत्येश्वर नावाचा भाऊ होता. सत्येश्वरीच्या भावाचा मृत्यू नागपंचमी सणाच्या आदल्या दिवशी झाला; आपल्या भावाच्या शोकात सत्येश्वरीने त्या दिवशी अन्नग्रहण केले नाही; त्यामुळे स्त्रिया भावाच्या रक्षणासाठी या दिवशी उपवास करतात व नागाची पूजा करतात.

नागाची पूजा करण्यामागील आणखी एक कारण म्हणजे; असे मानले जाते की, सत्येश्वरीला तिचा भाऊ नाग रुपामध्ये दिसला; त्यामुळे तिने त्या नागरुपाला, आपला भाऊ माणून पूजा केली; त्यावेळी नागदेवतेने वचन दिले की, यापुढे कोणतिही स्त्री भाऊ म्हणून माझी पूजा करेल; त्या स्त्रीचे मी भाऊ म्हणून रक्षण करीन. त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी प्रत्येक स्त्री नागाला आपला भाऊ माणून नागाची पूजा करते. (Importance of the Festival of Nag Panchami)

नागपंचमीला झोका खेळण्या मागील कारण

सत्येश्वरीला दुस-या दिवशी तिचा भाऊ दिसला नाही; त्यामुळे ती अतिशय दु:खी झाली; व ज्ंगलात इकडून तिकडे सैरावैरा धाऊ लागली. झाडांच्या फांदयांवर चढून ती भावाचा शोध घेऊ लागली; त्यावेळी नागराज सत्येश्वराच्या रुपात प्रकट झाले; ते पाहून सत्येश्वरीला प्रचंड आनंद झाला. आनंदाच्या भरात ती झाडाच्या फांदयांवर झोके घेऊ लागली; त्यामुळे स्त्रिया ना्गपंचमीच्या दिवशी झोका खेळतात. (Importance of the Festival of Nag Panchami)

आपल्या भावासाठी सत्येश्वरीने केलेला शोक पाहून; नागदेव प्रसन्न झाले; त्यांनी तिला आनंदी करण्यासाठी नवीन वस्त्र व अलंकार दिले. तेंव्हापासून नागपंचमी सणाच्या दिवशी; स्त्रिया व मुली अलंकार व नवीन वस्त्र परिधान करतात.

नागपंचमीच्या दिवशी काय करु नये

नागपंचमीच्या दिवशी शेतात नांगरणी करु नये; टिकाव किंवा कुदळीसारख्या टोकदार अवजाराने जमीन खणू नये; विळी किंवा चाकूने भाज्या चिरु नयेत; खाण्याचे पदार्थ तळू नयेत, चुलीवर तवा ठेवू नये; असे विविध संकेत या दिवशी पाळले जातात.  (Importance of the Festival of Nag Panchami)

ग्रामीण स्त्रिया हा सण कसा साजरा करतात

नागपंचमिच्या सणाच्या निमित्ताने मुली माहेरी येतात; नागपंचमीच्या सणाच्या दिवशी गावातील स्त्रिया; पारंपारिक वेषभूषा करतात. सणाच्या निमित्ताने माहेरी आलेल्या व गावातील सर्व स्त्रिया; एकत्र जमतात. वाजतगाजत सर्व स्त्रिया वारोळाला जातात; तेथे नागदेवतेची म्हणजे वारोळाची फुले, हळद, कुंकु, दूध व लाह्या वाहून पूजा करतात.

गावातील उंच झाडांना बांधलेले झोके; टोळक्या-टोळक्याने जाऊन खेळतात. संध्याकाळी पुन्हा सर्व स्त्रिया एकत्र जमून फेर धरतात; व नागोबाची गाणी गात हा सण अतिशय उत्साहाने व आनंदी वातावरणात साजरा करतात. (Importance of the Festival of Nag Panchami)

नागपंचमी सणाबाबतची कथा

Importance of the Festival of Nag Panchami
Photo by Donald Tong on Pexels.com

श्रावण महिण्यातील बहुतेक सणांना; इतिहासाची पार्श्वभूमी आहे. वेगवेगळया कथांच्या स्वरुपात हा इतिहास; एका पिढीकडून दुस-या पिढीकडे कथांच्या रुपाने पोहोचवला जातो. नागपंचमी सणाबाबत अनेक कथा आहेत त्यापैकी एक प्रचलीत कथा खाली दिलेली आहे.

एका राज्यामध्ये एक गरीब शेतकरी; आपली पत्नी, दोन मुले व एक मुलगी यांच्या बरोबर राहात होता. त्या शेतक-याच्या शेतामध्ये एक वारुळ होते; त्या वारुळामध्ये एक नागीन आपल्या पिल्लांबरोबर रहात होती. शेतकरी आपले शेत नांगरत असताना; च्याकडून त्या वारुळातील नागाची तीन पिल्ले चिरडून मारली गेली. (Importance of the Festival of Nag Panchami)

मरण पावलेल्या पिल्लांना पाहून; नागिणीने प्रचंड आक्रोश केला. माझ्या पिल्लांना मारणा-यास मी सोडणार नाही; अशी सूडाची आग त्या नागिणीच्या मनामध्ये धगधगू लागली. सूड घेण्यासाठी एके दिवशी रात्री नागीण; शेतक-याच्या घरात घुसते. तेथे शेतकरी, त्याची पत्नी व दोन मुलांना दंश करुन ठार मारते.

अजुनही नागिणीची सुडाची आग शमलेली नव्हती; कारण शेतक-याची मुलगी अजून जिवंत होती. तिला दंश करण्यासाठी नागीन पुन्हा; शेतक-याच्या घरी जाते. नागिणीने आपले आई-वडील व भाऊ; यांना दंश करुन मारले होते; तरी, ती घरामध्ये नागदेवतेचे चित्र काढून पूजा करत होती; हे नागदेवतेने पाहिले. (Importance of the Festival of Nag Panchami)

आपण या मुलीच्या आई-वडिलांना व तिच्या दोन भावंडाना ठार मारले असताना देखील; ही मुलगी आपली पूजा करत आहे; तिची श्रद्धा व भक्ती पाहून नागदेवता तिच्यावर प्रसन्न होते; व त्या मुलीचे आई-वडील व भाऊ यांना पुन्हा जिवंत करते. तो दिवस होता श्रावण शुक्ल पंचमीचा; त्यामुळे या दिवसापासून; श्रावण महिण्यात येणा-या पंचमीला नागदेवतेचा कोप दूर करण्यासाठी; नागाची पूजा मोठ्या भक्तीभावाने केली जाते. (Importance of the Festival of Nag Panchami)

परीक्षित राजाची कथा

परिक्षित नावाचा एक राजा होता; एकदा हा राजा शिकारीसाठी जंगलात गेला. शिकारीसाठी तो जंगलात खूप भटकला; तेंव्हा त्याला खूप तहान लागली. पाण्याचा शोध घेत घेत राजा एका झोपडी जवळ आला; झेपडीच्या बाजूला एक आश्रम होता; तिथे तो गेला. त्या अश्रमामध्ये एक ऋषी तपश्चर्या करीत बसलेले होते; हे त्याने पाहिले. राजाने ऋषींकडे जाऊन पिण्यास पाणी मागितले.

तपश्चर्यामध्ये मग्न असलेल्या ऋषींना; राजाचा आवाज ऐकू आला नाही. आपल्या आवाजाला प्रतिसाद दिला नाही; म्हणून, राजाला अतिशय राग आला. रागातच राजाने ऋषींच्या गळयात मेलेला एक साप टाकला. राजाचे हे कृत्य जवळच असलेल्या; त्या ऋषींच्या मुलाने पाहिले. राजाच्या या कृत्याचा त्याला अतिशय राग आला; आणि त्याने परीक्षित राजाला शाप दिला की; “हे राजा तुला सातव्या दिवशी दक्षक नावाच्या सापाकडून सर्पदंश होईल आणि त्यातच तुझा मृत्यू होईल.”

ऋषींच्या मुलाने दिलेल्या शापामुळे परीक्षित राजा अतिशय घाबरला; तो लगेच राजवाडयात आला आणि घडलेली सर्व घटना; त्याने आपल्या कुटुंबियांना सांगीतली. परीक्षित राजाच्या मुलाने आपल्या पित्याचे प्राण वाचवण्यासाठी; एक मोठा यज्ञ सुरु केला. यज्ञ सुरु असताना त्या ठिकाणी अनेक नाग येऊ लागले; आणि ते त्या यज्ञकुंडामध्ये स्वतःला झोकून जीव देऊ लागले.

त्यांनतर परीक्षित राजा, त्याचा मुलगा व सर्व नाग ऋषींना शरण गेले; राजाने व त्याच्या मुलाने आस्तिक ऋषींची क्षमा मागितली. परीक्षित राजाने व त्याच्या मुलाने ज्या दिवसापासून; नागदेवाची पूजा करण्यास सुरुवात केली; तो दिवस होता श्रावण महिन्यातील शुक्ल पंचमी. तेंव्हापासून श्रावण महिन्यातील शुक्ल पंचमी नागपंचमी म्हणून साजरी केली जाते. (Importance of the Festival of Nag Panchami)

सारांष

अशा प्रकारे या लेखाद्वारे नागपंचमी सणाचे महत्व; उपवास, नागपंचमीचा झोका, नवीन कपडे व अलंकार परिधान करण्यामागील कारण; ग्रामीण भागात साजरी केली जाणारी नागपंचमी; व नागपंचमी बद्दलच्या कथा; ही सर्व माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. (Importance of the Festival of Nag Panchami)

FAQs: नागपंचमी सणाचे महत्व या विषयीचे प्रश्न

नागपंचमीला काय करु नये?

सापांना इजा करणे नागपंचमीच्या वेळी सापांना इजा न करणे किंवा मारणे महत्वाचे आहे. हा सण श्रद्धेचा आहे आणि या प्राण्यांना हानी पोहोचवणे त्याच्या आध्यात्मिक तत्वाच्या विरुद्ध आहे. जंगलातून साप घेणे सणादरम्यान प्रदर्शनासाठी जंगलातील साप पकडणे टाळा. (Importance of the Festival of Nag Panchami)

नागपंचमीला पदार्थ तळले जातात का?

उत्सवादरम्यान, स्त्रिया उपवास किंवा व्रत पाळतात, जेथे ते अन्न वर्ज्य करतात. हे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत चालते. या शुभ दिवशी तळलेले किंवा खारट अन्न तयार केले जात नाही (Importance of the Festival of Nag Panchami)

नागपंचमीला काय खाऊ नये?

नागपंचमीच्या सणाला पालेभाज्या खाणे टाळा. भक्त नागदेवतेला दूध अर्पण करतात म्हणून या शुभ सणात दूध पिणे टाळावे. (Importance of the Festival of Nag Panchami)

नागपंचमी कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे?

नागपंचमी हा एक हिंदू सण आहे जो सापांच्या पूजेला समर्पित आहे. नागपंचमी सण श्रावण महिण्यातील शुक्ल पंचमीच्या दिवशी; दिवशी साजरा केला जातो. हा सण भारताच्या विविध भागात, विशेषतः महाराष्ट्र, कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये साजरा केला जातो. (Importance of the Festival of Nag Panchami)

नागपंचमीला उपवास का करतात?

या दिवशी हिंदू नाग देवतेची पूजा करतात. असे म्हटले जाते की नागपंचमीच्या दिवशी उपवास केल्याने सर्पदंशाच्या भीतीपासून निश्चित संरक्षण मिळते. या दिवशी नाग देवतांच्या मूर्तींची किंवा फोटोंची दूध, मिठाई, फुले आणि दिवे लावून पूजा केली जाते. अनेक ठिकाणी भाविक जिवंत सापांना दूधही अर्पण करतात. (Importance of the Festival of Nag Panchami)

आशा आहे की, ही पोस्ट आपणास आवडली असेल; आपल्या प्रतिक्रिया व अभिप्राय जरुर कळवा; व आपल्या मित्रांबरोबर ही पोस्ट नक्की शेअर करा. धन्यवाद!…!

Related Posts

Post Categories

आमच्या Etopcollection वेबसाईटला जरुर भेट द्या, तसेच शैक्षणिक माहितीसाठी “ज्ञानज्योत” शैक्षणिक मराठी संकेत स्थळाला भेट द्या.

[pt_view id=”55cff900qc”]

Leave a Reply

Discover more from मराठी बाणा

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading