It can happen back through the door of death: असेही होऊ शकते! २४ स्कोर असताना…मृत्यूच्या दारातुन माघारी…
असे म्हणतात की, “देव तारी त्याला कोण मारी” याचा प्रत्यय लातूर जिल्ह्यातील; औसा शहरातील परंतू सध्या नोकरीच्या निमित्ताने पुणे येथे राहात असलेले; भिमाशंकर स्वामी यांना आला. भिमाशंकर स्वामी यांना ८ एप्रिलला कोरोनाची लागन झाली; त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नीचाही रिपोर्ट पॉझिाटिव्ह आला. (It can happen back through the door of death)
अशा परिस्थित त्यांच्या मदतीला त्यांचे भाऊ शिवशंकर स्वामी आले; त्यांनी पुण्यात बेड मिळविण्यासाठी खूप प्रयत्न केले; परंतू त्यांना बेड मिळत नसल्यामुळे, शिवशंकर स्वामी यांनी; त्यांना लातूरला हलवण्याचा निर्णय घेतला.
दिनांक ९ एप्रिल रोजी भिमाशंकर स्वामी व त्यांची पत्नी यांना लातूरला आणले; त्यांच्या छातीचा स्कॅन केल्यानंतर समजले की; कोरोनाने त्यांचे फुप्फूस २५ पैकी २४ टक्के संक्रमित केले आहे. त्यानंतर त्यांच्या भावाने तातडीने निर्णय घऊन; त्यांना लातूर येथील शीतल पाटील यांच्या “व्यंकटेश” हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले. (It can happen back through the door of death)

वाचा: कोरोना रुग्णांसाठी अतिशय दिलासादायक बातमी, ज्या व्यक्ती “महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेस” पात्र असतील त्यांच्यासाठी …
भिमाशंकर याच्या छातीच्या स्कॅनचा रिपोर्ट स्कोर पंचवीस पैकी चोवीस आला आणि फुप्फूसाने ९० टक्के काम थांबविले होते. रिपोर्ट पाहिल्यावर डॉ. पाटील यांनाही रुग्ण वाचण्याची खात्री वाटत नव्हती. मात्र डॉक्टरांनी त्यांचे प्रयत्न चालूच ठेवले.
एवढेच नाही तर रुग्णाच्या नातेवाईकांना धीर दिला आणि उपचार सुरुच ठेवले. सुरुवातीचे दोन दिवस डॉक्टरांनाही यश येत नव्हते. अशा परिथितीत डॉक्टरांनी कशाचीही पर्वा न करता त्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न केले.
त्यांची वाचण्याची शक्यता कमी असतानाही डॉक्टरांनी त्यांच्यावर केलेले उपचारामुळे तिसऱ्या दिवशी त्यांना थोडा आराम वाटू लागला. भिमाशंकर यांची लढाऊ वृत्ती आणि त्याला मिळालेली भावाची साथ या सर्वांमुळे भिमाशंकर अक्षरश: मृत्यूच्या दारातून परत आले. (It can happen back through the door of death)
वाचा: 18 वर्षांवरील सर्व वयोगटातील लोकांना १ मे पासून कोरोना लसीकरण
या काळात रुग्णाचा भाऊ शिवशंकर हे सावलीसारखे आपल्या भावाच्या जवळ होते. कोरोना रुग्णाच्या जवळ सहसा कोणी थांबायला तयार होत नाही. परंतू शिवशंकर हे आपल्या भावाजवळच बसून होते. त्यांना स्वतः बद्दल जराही भीती वाटत नव्हती.
त्यांना त्यांच्या भावाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर आणायचे होते. शिवशंकर यांची वहिनी आणि भाऊ दोघेही संक्रमित असतांना त्यांनी भावाला धीर दिला. मी आहे तू अजिबात काळजी करु नकोस असा विश्वास दिला. त्यां
च्या वहिनींना १४ तारखेला डिस्चार्ज मिळाला. आणि भावालाही नंतर तीन दिवसांनी म्हणजे १७ तारखेला घरी पाठविण्यात आले. त्यांचा स्कोर आता शून्यावर आला असून त्यांचे फुफुस नव्वद टक्के काम करीत आहे.
वाचा: कोरोना लसीकरणासाठी “अशी करा नोंदणी
शिवशंकर स्वामी म्हणाले की, माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी; डॉक्टर शीतल पाटील हे देवदूत आहेत. त्यांनी काळजीपूर्वक केलेले उपचार; आणि मानसिक आधार दिल्यानेच माझा भाऊ आज; मरणाच्या दारातून परत आला आहे. आशा काळात नातलग आणि जवळच्या मित्रांनी रुग्णाला जो मानसिक आधार दिला; तोच त्याला वाचविणारा ठरला आहे.
रुग्णाच्या मनातली भीती ही त्या आजारापेक्षाही जास्त घातक असून; सर्वांनी अशा रुग्णांना मानसिक आधार देणे गरजेचे असल्याचे; शिवशंकर स्वामी यांनी सांगितले. त्यामुळे प्रत्येकाने जमेल तसे कोवीड रुग्नांना; व रुग्नाच्या कुटुंबियांना मानसिक आधार दिला पाहिजे.
अशी वेळ कोणावरही येवू नये; देव करो आणि हे संकट लवकर टळो. अशा उदाहरणामधून संकटकाळी स्वतःची काळजी घेत इतरांना मदत करण्याची प्रेरणा मिळते.
COVID19 चा संसर्ग टाळण्यासाठी घ्यावयाच्या खबरदारी
ज्यांनी 2020 च्या 1 फेब्रुवारी ते 2 मार्चच्या दरम्यान प्रवास केला आहे; त्यांनी सरकारी सूचनांनुसार स्वतःला आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना; अनिवार्यपणे अलग ठेवणे आवश्यक आहे. याचे कारण असे की ते लक्षणे नसलेले वाहक असू शकतात; म्हणजेच त्यांच्या शरीरात विषाणू असू शकतात परंतु अद्याप कोणतीही लक्षणे दाखवू शकत नाहीत.
सेल्फ-क्वारंटाईन म्हणजे कुटूंबाला त्यांच्या घरात अलिप्त राहणे आवश्यक आहे; बाहेर कोणाशीही किंवा कमी संपर्क न ठेवता. कुटुंबातील सर्व सदस्यांनी घरामध्ये संसर्ग होण्याची शक्यता मर्यादित करण्यासाठी; प्रत्येक वेळी मास्क घालावे. त्यांनी वारंवार हात धुवावेत आणि चेहऱ्याच्या कोणत्याही भागाला स्पर्श करणे टाळावे.
ज्या सामान्य लोकांचा कोणताही प्रवास इतिहास नाही; त्यांनी सामाजिक अंतर पाळावे. यामध्ये जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी बाहेर पडल्याशिवाय घरीच राहणे समाविष्ट आहे; आणि जेव्हा ते घराबाहेर पडतात तेव्हा कापडी मुखवटा घेऊन जा आणि त्यांनी इतर लोकांपासून 1-मीटर अंतर राखले पाहिजे.
घरी परतल्यानंतर त्यांनी घरात प्रवेश करण्यापूर्वी; हात आणि पाय साबण आणि पाण्याने धुवावेत. भाज्या आणि फळे; हळद मिसळलेल्या मीठ पाण्याने धुवावीत. घराच्या आत, कुटुंबातील सर्व सदस्यांनी शक्य तितक्या वेळा साबण पाण्याने 20 सेकंद हात धुवावेत.
हा विषाणू कापड, चामडे, धातू, प्लास्टिक आणि संमिश्र सारख्या साहित्यावर; काही तास ते दिवसापर्यंत जिवंत राहू शकतो; म्हणून यात जवळजवळ प्रत्येक वस्तू किंवा पृष्ठभागाचा समावेश आहे. म्हणूनच, शक्य तितक्या वेळा 20 सेकंद आपले हात; पूर्णपणे धुणे अत्यावश्यक आहे. तसेच, तुम्ही तुमच्या चेहऱ्याला अनावश्यक स्पर्श करु नये.
निष्कर्ष
कोविड- 19 च्या तुलनेत अनेक सोशल मीडिया पोस्ट आणि सरकारी संस्थांनी सूचित केल्याप्रमाणे; अपघात आणि इतर आजारांमुळे जास्त लोक मरतात. हा विषाणू अधिक संसर्गजन्य, कमी विषाणूजन्य आणि प्राणघातक नाही; आणि तज्ञ वैद्यकीय सेवा असूनही संसर्ग झालेल्या उच्च-जोखमीच्या केवळ 5% लोकांना ठार करतो. त्यामुळे भीती किंवा भीतीचे कोणतेही कारण नाही.
संकटावर मात करण्यासाठी प्रतिबंध हा एकमेव मार्ग आहे; वर वर्णन केल्याप्रमाणे पुरेशी खबरदारी घ्या, दररोज, दिवसभर. निश्चिंत राहा; जगातील अनेक देशांपेक्षा आपण भारतातील संकटावर अधिक चांगल्या प्रकारे मात करु शकतो. कोणताही आजार झाल्यानंतर ईलाज करण्यापेक्षा; तो आजार होऊनये यासाठी काळजी घ्या.
समाजातील खरे काविड योद्धे
कोविड -19 च्या दुस-या लाटेमुळे समाजातील लोक; अभूतपूर्व आरोग्याच्या संकटावर मात करण्याचा प्रयत्न करीत असल्याच्या; असंख्य घटना घडत आहेत. अशा प्रकारच्या संकट समयी; समाजातील काही लोक देवदूतासारखे लोकांना मदतही करत आहेत.
सरकारने अशा काही लोकांची माहिती सामायिक केली आहे; मायगोव्ह यांनी एका ट्विटमध्ये अशा तीन लोकांविषयी; माहिती शेअर केली आहे. जे कोविड संकटात इतरांना मदत करत आहेत.
केंद्राच्या या सकारात्मक बातम्यांच्या यादीमध्ये; काश्मीरमधील मझूर अहमद, गुजरातमधील शेतकरी; आणि आग्रा येथील नीना मुनियाल हे आहेत. रोजच्या सकारात्मक बातमीनुसार सरकारने त्यांची नावे ;व गरजू लोकांसाठी त्यांनी काय केले हे प्रकाशित केले आहे.
काश्मीरमधील मझूर अहमद
MyGoV, नुसार मझूर अहमद दम्याचा रुग्ण आहे. तथापि; त्याच्या वैद्यकीय स्थितीमुळे कोविडशी लढा देणा-या; इतरांना मदत करण्यास ते थांबले नाही. मझूर अहमद स्वत: दम्याचो रुग्न असूनही ते कोविड रुग्णांना ऑक्सिजन सिलिंडर्स; पुन्हा भरण्यासाठी व वितरीत करण्यासाठी एक छोटासा ट्रक चालवतात.
गुजरातमधील शेतकरी
गुजरातच्या गिर येथील आर गोराड फार्मचे शेतकरी या महिन्यात लागवड केलेले सर्व नारळ जुनागड सिव्हिल हॉस्पिटलमधील कोविड रुग्णांना विनामूल्य देतील.
आग्रा येथील निना मुनियाल
निना मुनियाल यांनी ‘प्रसाद’ हा उपक्रम सुरू केला आहे; जो दररोज 100 हून अधिक कोविड रुग्णांना घरी शिजवलेले पौष्टिक जेवण पुरवतात.
वाचा:
- Techniques and Methods of Water Purification: जलशुद्धीकरण
- 10 Benefits of Water Purification for Health: जलशुद्धीचे फायदे
- What are the types of water purifiers? | वॉटरप्युरिफायर्सचे प्रकार
- शैक्षणिक माहितीसाठी “ज्ञानज्योत” शैक्षणिक मराठी संकेत स्थळाला भेट द्या.

Ganpati-2 Know all about Siddhivinayak Siddhatek | सिद्धिविनायक

Ganpati-1 Know all about Moreshwar Morgaon | मोरेश्वर, मोरगाव

What are daily good habits? | रोजच्या चांगल्या सवयी काय आहेत?

Share the lessons you have learned in life | आयुष्यात शिकलेले धडे

Know the effects of multitasking on health | मल्टीटास्किंगचे परिणाम

Value of additional courses to get a job | नोकरीसाठी अतिरिक्त कोर्स

How to Memorize Study? | अभ्यास लक्षात कसा ठेवावा?

Best Qualities of a Great Lawyer | चांगल्या वकिलाचे गुण

Sources of water pollution and its control | जल प्रदूषण
